राजकीय

सेवा, शिक्षण आणि विकासाच्या बळावर प्रभाग २२ मध्ये आसाराम विरकरांचा उदय**


 

छत्रपती संभाजीनगर | लोक योद्धा विशेष :

आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये जनतेचा कल आता सेवाभावी, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्वाकडे वळताना दिसत आहे. सर्वसामान्यांतून उभे राहिलेले आसाराम पार्वतीबाई बाळासाहेब वीरकर हे नाव आज प्रभागात विश्वास, आशा आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक बनत चालले आहे.

गेल्या २६ वर्षांपासून याच प्रभागात वास्तव्यास असलेले वीरकर समाजसेवा, सहकार, पत्रकारिता, व्यवसाय आणि संघटनात्मक कार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या सुख-दुःखाशी जोडले गेले आहेत. “हा आमच्यातलाच नेता” अशी भावना घराघरांत व्यक्त होत असून, कामाच्या जोरावर नेतृत्व घडतेय, असा विश्वास नागरिकांत बळावत आहे.

*शिक्षणातून घडलेले परिपक्व नेतृत्व*

एम.ए. (लोकप्रशासन व राज्यशास्त्र) आणि GDC & A या अभ्यासपूर्ण शिक्षणामुळे प्रशासनाची सखोल जाण असलेले वीरकर विकासाचे मुद्दे केवळ मांडत नाहीत, तर त्यासाठी ठोस पाठपुरावा करतात. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, महिला सुरक्षा, युवक-विद्यार्थी प्रश्न आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर त्यांची स्पष्ट व सकारात्मक भूमिका आहे.

*सेवाभावातून उभा राहिलेला जनतेचा विश्वास*

*Veercon Insurance & Financial Services* च्या माध्यमातून शेकडो कुटुंबांशी थेट संपर्क ठेवत अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारे वीरकर हे नाव आज प्रभागात विश्वासाचे प्रतीक बनले आहे. आर्थिक सल्ला असो वा सामाजिक मदत — नागरिकांसाठी ते नेहमीच उपलब्ध असतात, असे मत प्रभागात ऐकू येते.

*संघटनात्मक ताकदीमुळे मजबूत नेतृत्व*

गेल्या १५ वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ता, बूथ प्रमुख आणि गारखेडा मंडळ कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटन उभे केले आहे. शिस्त, समर्पण आणि विचारधारेशी निष्ठेमुळे ते प्रभाग २२ मधील एक बळकट आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.

*पत्रकारिता व सहकारातून समाजाशी नाते*

दैनिक “युवक आधार” चे संपादक म्हणून जनतेचे प्रश्न मांडत समाजाचा आवाज बनलेले वीरकर, तसेच संत शिरोमणी सावता महाराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून २,५०० हून अधिक नागरिकांशी जोडले गेले आहेत. महिला बचत गट, महात्मा फुले युवा सेवा संस्था आणि नारी शक्ती उडान प्रोजेक्टद्वारे महिला सक्षमीकरण व युवक स्वावलंबनासाठी त्यांनी राबवलेले उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरत आहेत.

काम बोलेल’ हीच ओळख*

नामदार अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजू रुग्णांना कोट्यवधींची मदत मिळवून देण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणारी हीच त्यांची ओळख जनतेच्या मनात घर करत आहे.

**विकासाचा स्पष्ट आराखडा –

                         – ISO प्रभागाचा संकल्प**

स्वच्छ व सुरक्षित प्रभाग, दर्जेदार रस्ते, पाणी व ड्रेनेज व्यवस्था, महिला सुरक्षा, आरोग्य शिबिरे, युवक-विद्यार्थी-ज्येष्ठांसाठी विशेष योजना, धार्मिक व सामाजिक स्थळांचा विकास तसेच अत्याधुनिक ग्रंथालय व अभ्यासिका उभारण्याचा संकल्प त्यांनी मांडला आहे. प्रभाग २२ ला ISO नामांकित बनवण्याचा निर्धार नागरिकांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण करत आहे.

**

“दार उघडं असलेला माणूस”, “आश्वासन नाही तर काम करणारा नेता”, “हा आमच्यातलाच” अशा प्रतिक्रिया प्रभागात ऐकू येत असून, आसाराम वीरकर हे नाव आता केवळ इच्छुक उमेदवार न राहता प्रभागातील सकारात्मक बदलाचे केंद्र बनत चालले आहे.

सेवा, शिक्षण आणि विकास या तीन स्तंभांवर उभे असलेले हे नेतृत्व प्रभाग २२ च्या भविष्यासाठी नवा विश्वास निर्माण करत असून, लोक योद्धाच्या वाचकांसाठीही ही घडामोड विशेष लक्षवेधी ठरत आहे.

 


लोक योद्धा

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *