ताज्या घडामोडी

भिषण आगीत बारा एकर ऊस जळुन खाक, लाखोंचे मोठे नुकसान


उध्दव इंगळे पाथरी …

पाथरी तालुकयातील पाथरगव्हाण बु. शिवारात शनिवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी अचानक लागलेल्या भिषण आगीत सुमारे १२ एकर ऊस जळून खाक झाला. आगीत ठिबक सिंचनाची पाईपलाईनसुध्दा जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळालेल्या ऊसाचे क्षेत्र (गुंठे) :

भारत गणेश घांडगे – ८० गुंठे

रामेश्वर भांनदास वरकड – ९० गुंठे

ज्ञानेश्वर वरकड – १०० गुंठे

सखाराम संतराम घांडगे – ४० गुंठे

सुभाष आबासाहेब घांडगे – १४० गुंठे

बालासाहेब श्रीमंत घांडगे – ८० गुंठे

स्थानिकांच्या माहितीनुसार, हादगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून येणाऱ्या ११ केव्ही कृषी वाहिनीवरील विद्युत तार तुटून ऊसाच्या शेतात पडल्याने आग लागली. वाऱ्याच्या तीव्रतेमुळे आग काही क्षणातच फैलावत मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दोन दिवसांपूर्वी सिमुर गव्हाण येथेही ६ एकर ऊस जळाल्याने पाथरी तालुक्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.


लोक योद्धा

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *